उजनीतून भीमेत 51,600 क्युसेकने विसर्ग

उजनीतून भीमेत 51,600 क्युसेकने विसर्ग
Published on
Updated on

बावडा : उजनी धरणातून भीमा नदीमध्ये सोडण्यात येणार्‍या पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला असून, मंगळवारी (दि.11) सायंकाळी 6.30 वाजता तब्बल 51 हजार 600 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. उजनी धरणामध्ये मंगळवारी सायंकाळी 6 वाजेचा पाणीसाठा हा 123.22 टीएमसी एवढा प्रचंड असून, धरण 111.17 टक्के क्षमतेने भरलेले आहे.

उजनीतून सोडण्यात येणारा पाण्याचा विसर्ग मंगळवारी सकाळी 10 वाजता 6 हजार 600 क्युसेकवरून 10 हजार क्युसेक करण्यात आला. वाढ करून तो सायंकाळी 6.30 वाजता तब्बल 50 हजार क्युसेक करण्यात आला. त्यामुळे सायंकाळी 6 वाजता उजनी धरणातून होणारा विसर्ग 51 हजार 600 क्युसेक एवढा झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news