नारायणगाव : जोरदार वार्‍यामुळे गव्हाचे नुकसान; आंबा मोहोर गळाला

नारायणगाव : जोरदार वार्‍यामुळे गव्हाचे नुकसान; आंबा मोहोर गळाला
Published on
Updated on

नारायणगाव; पुढारी वृत्तसेवा : सोसाट्याचा वारा, विजेच्या कडकडाटासह सोमवारी (दि. 6) सायंकाळी नारायणगाव, वारुळवाडी, कोल्हे मळा, गुंजाळवाडी परिसरात पाऊस झाला. पावसामुळे शेतकरीवर्गाची पळापळ झाली. गहू, हरभरा तसेच द्राक्ष बागायतदारांचे यामुळे नुकसान झाले. द्राक्षाची गुणवत्ता पावसामुळे घसरण्याची शक्यता आहे.

नारायणगाव परिसरात गहू, हरभरा पिकांची काढणी सुरू असतानाच सोमवारी सायंकाळी पावसाने हजेरी लावली. यामुळे गहू, हरभरा पिकांचे नुकसान झाले. आंब्याला आलेला मोहोर तसेच लगडलेल्या कैर्‍या गळून पडल्या. पावसामुळे काही ठिकाणी द्राक्षपिकाचे नुकसान झाले. द्राक्षमण्यांना तडे जाण्याची शक्यता द्राक्ष बागायतदार संदीप वारुळे यांनी वर्तवली. यामुळे द्राक्षाची गुणवत्ता घसरून शेतकर्‍याचे आर्थिक नुकसान होणार आहे. दरम्यान, मंगळवारी (दि. 7) दुपारी पुन्हा हलक्या सरी बरसल्या. पावसाने जोर धरल्यास फळभाज्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news