कळस परिसरात भटक्या कुत्र्यांची दहशत
कळस(ता. इंदापूर); पुढारी वृत्तसेवा : कळस परिसरात भटकंती करणा-या कुर्त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शालेय विद्यार्थ्यांसह नागरिकांना याचा नाहक त्रास होत आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने वेळीच कुत्र्यांच्या बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. भटकंती करणारी कुत्री टोळक्याने फिरत असतात.
दुचाकीस्वार जवळ येताच अंगावर अचानकपणे झडप मारून हल्ला चढवितात, दूरवर वाहनांचा पाठलाग करताना झटापटीत अनेकदा अपघातही घडत आहेत. तसेच भटकंती करणारी कुत्री दुचाकीला आडवी जाऊन वाहनचालकांना जीवही गमवावे लागले आहेत. त्यामुळे ग्रा.पं. प्रशासनाने वेळीच दक्षता घेऊन भटकंती करणा-या कुत्र्यांच्या बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.