

पुणे; पुढारी वृत्तसेवा : थंडीचा उत्पादनावर परिणाम झाल्याने मार्केट यार्डातील घाऊक फळबाजारात फळांची आवक घटली आहे. बाजारात दाखल होत असलेल्या मालाच्या तुलनेत मागणी मोठी असल्याने कलिंगड, पपई व खरबुजाच्या भावात किलोमागे 2 ते 5 रुपयांनी वाढ झाली आहे. तसेच, लिंबाचे भावही 15 किलोंच्या गोणीमागे 100 रुपये तर सफरचंदाचे 15 ते 16 किलोंच्या पेटीमागे शंभर रुपयांनी वधारले आहे. उर्वरित सर्व फळांची आवक जावक कायम असून गेल्या आठवड्यातील दर टिकून आहेत.
रविवारी (दि. 15) मार्केटयार्ड येथील फळबाजारात केरळ येथून अननस 6 ट्रक, संत्री 10 ते 15 टन, मोसंबी 35 ते 40 टन, डाळिंब 15 ते 20 टन, पपई 4 ते 5 टेम्पो, लिंबे सुमारे 1 हजार 500 गोणी, पेरू 700 ते 800 क्रेटस, कलिंगड 3 ते 4 गाड्या, खरबुज 2 ते 3 गाड्या, बोरे 500 ते 550 पोती तर सीताफळाची 1 ते 2 टन इतकी आवक झाली.
फळांचे भाव पुढीलप्रमाणे – लिंबे (प्रति गोणी) : 400-500, अननस : 100-550, मोसंबी : (3 डझन) : 160-320, (4 डझन) : 50-140, संत्रा : (10 किलो) : 300-800, डाळिंब (प्रति किलोस) : भगवा : 80-250, गणेश : 10-50, आरक्ता 30-60. कलिंगड : 8-12, खरबूज : 15-35, पपई : 12-20, पेरू (20 किलो) : 250-350, चिकू (10 किलो) : 80-500, सीताफळ : 20-100, बोरे (10 किलो) : चेकनट : 1000-1200, उमराण : 70-100, चमेली : 300-500, चण्यामण्या : 500-600. सफरचंद : काश्मीर डेलिशिअस (15 ते 16 किलो) 1100-1400, किन्नोर : 2000-2200. किन्नू (10 ते 11 किलो) 600-750.