![तळेगाव ढमढेरे : लाटलेल्या जमिनीवर झाली गुंठेवारी; पुनर्वसनाच्या जमिनी अल्प दरात घेतल्या ताब्यात](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2022%2F12%2FLAnd.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
तळेगाव ढमढेरे; पुढारी वृत्तसेवा : पुनर्वसन क्षेत्रात अल्प दरात जमिनी घेऊन विकसित करून प्लॉटिंगधारकांनी गडगंज पैसा कमावला. याच जमिनीत गुंठेवारी करून त्याची विक्री केली आहे. ही प्रकरणे भविष्यात बाहेर आल्यानंतर गुंठा खरेदीदारांची घोर फसवणूक होण्याची शक्यता आहे. शेतकर्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न पुनर्वसन आहे. अनेक वर्षे पुनर्वसनासाठी झगडणारे होऊन गेले; मात्र पुनर्वसन उठले नाही. मग याचा फायदा घेऊन प्लॉटिंगधारकांनी धरणग्रस्त माणूस पकडून आणायचा, त्याची जमीन अल्प दरात मिळवायची, त्याच्याकडून खरेदी करून प्लॉटिंगमध्ये गुंतवणूक करून घ्यायची, असा हा गोरखधंदा बिनबोभाट झाला आहे.
या प्रकरणाचे लोन बड्या नेत्यांपासून सनदी अधिकार्यांपर्यंत पसरले आहे. यामध्ये मुळाशी गुंठा खरेदीदार असतो. प्लॉटिंगवाले जमिनीची विक्री करून गायब होतात. फसवणूक मात्र गुंठा मालकाची होती. दरम्यान मागील 2 वर्षात बर्याच प्रकरणांमध्ये धरणग्रस्त हे बोगस आहेत किंवा अपात्र आहेत असे निदर्शनास आले आहे. तसेच बर्याच धरणग्रस्तांनी अनुज्ञेय क्षेत्रापेक्षा जास्त पर्यायी जमीन मिळवल्याचे लक्षात आले आहे.
बर्याच धरणग्रस्तांनी जमिनी आदेश होण्यापूर्वीच विकल्या आहेत वा आदेशपत्रावरून बेकायदेशीररीत्या पुनर्वसन एजंटांमार्फत जमिनी कविडीमोल किमतीला विकल्या आहेत. अशा पुनर्वसन जमिनींमध्ये प्लॉटिंगचा व्यवसाय जोरदार सुरू आहे आणि सर्व पर्यायी पुनर्वसन जमिनींमध्ये चुकीच्या पद्धतीने ताबे देण्यात आलेले आहेत, असे दिसून येत आहे. अपघातात ठार झाल्याच्या नोंदी पोलिस दप्तरी आहेत. तातडीने याबाबत उपाययोजना करण्याची मागणी या रस्त्याच्या लगतच्या नागरिकांकडून होत आहे.