बिबवेवाडी : आजही दलित पँथरच्या डरकाळीची आवश्यकता; केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे प्रतिपादन

आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते बाबूराव घाडगे आणि लता घाडगे या दाम्पत्याचा ‘कट्टर पँथर’ हा पुरस्कार प्रदान करताना केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंसह इतर मान्यवर.
आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते बाबूराव घाडगे आणि लता घाडगे या दाम्पत्याचा ‘कट्टर पँथर’ हा पुरस्कार प्रदान करताना केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंसह इतर मान्यवर.
Published on
Updated on

बिबवेवाडी; पुढारी वृत्तसेवा: 'एकेकाळी संपूर्ण देशामध्ये राजकीय वातावरण दलित पँथरने ढवळून काढले होते. अशा पँथरच्या डरकाळीची आजही मोठी गरज आहे,' असे मत केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले. भारतीय दलित पँथर या संघटनेच्या सुवर्णमहोत्सवी वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते बाबूराव घाडगे आणि लता घाडगे या दाम्पत्याचा 'कट्टर पँथर' हा पुरस्कार केंद्रीय मंत्री आठवले यांच्या हस्ते देऊन सन्मान करण्यात आला. या प्रसंगी आठवले बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ दलित साहित्यिक अर्जुन डांगळे, अविनाश महातेकर, माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे, बसवराज गायकवाड, शैलेंद्र चव्हाण, असित गांगुर्डे आदी उपस्थित होते. 'दलित पँथर संघटनेचे दलित चळवळीच्या दृढीकरणात मोठे योगदान राहिले आहे. आज पँथरच्या डरकळीची गरज आहे, कारण दलित समाज विखुरलेला आहे. त्याचप्रमाणे सामाजिक ऐक्य टिकवण्यासाठी दलितांच्या चळवळीची धार कायम राहण्यासाठी पँथरच्या कार्यकर्त्यांची डरकाळीची अत्यावश्यक आहे, असेही आठवले यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news