![पिंपरी : घरमालकाने केली शेजार्यास मारहाण](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2022%2F03%2F%E0%A4%B5%E0%A5%83%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A3.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पिंपरी; पुढारी वृत्तसेवा: 'ये-जा करण्याच्या मार्गावर धुणी-भांडी का करता?' असे विचारल्याने भाडेकरूने आपल्या घरमालकाला बोलावून मारहाण केल्याची घटना हिंजवडी येथील माणगावात शनिवारी (30 रोजी) घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विकास विलास साळुंके (वय 35, रा. माण, मुळशी) हे राहत असलेल्या ठिकाणी ये-जा करण्याच्या मार्गात भाडेकरू असलेले रमेश चव्हाण यांचे कुटुंबीय धुणी भांडी करीत होते.
याचा जाब विचारल्याने चव्हाण याने घरमालक असलेले आरोपी राजू जयसिंग ठाकर (वय 34), प्रीतम ठाकर (वय 35), आकाश ठाकर (वय 35) महिला आरोपी (वय 29), दत्तोबा ठाकर (वय 31), दत्तोबा यांची पत्नी (26 सर्व आरोपी रा. माणगाव) यांना बोलावून घेतले. सर्वांनी मिळून फिर्यादी, त्यांचे वडील आणि पत्नीस मारहाण करीत शिवीगाळ केली आहे.