अखेर दापोडीतील मैलाशुद्धीकरण प्रकल्प सुरू | पुढारी

अखेर दापोडीतील मैलाशुद्धीकरण प्रकल्प सुरू

दापोडी : येथील मैलाशुद्धीकरण प्रकल्प 15 ते 20 दिवसापांसून बंद होता. प्रकल्पाच्या टँकमध्ये शेवाळे आलेले दुर्गंधीयुक्त पाणी साचले होते. त्यामुळे पवना नदीलगत राहणार्‍या अनेक नागरिकांना दुर्गधीचा त्रास करावा लागत होता. अखेर हा प्रकल्प सुरू झाल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे. मैलाशुद्धीकरण प्रकल्प बंद असल्याबाबतचे वृत्त ‘दैनिक पुढारी’मध्ये प्रसिद्ध झाले होते.

त्यानंतर महापालिका प्रशासनाने याची दखल घेत प्रकल्प सुरू केला आहे. महापालिकेच्यावतीने कोट्यवधी रुपये खर्च करून मैलाशुद्धीकरण प्रकल्प उभारला आहे. प्रकल्प जवळ महावितरणचे काम सुरू होते; पण नियोजनशून्य काम सुरू होते. ट्रास्फार्मरच्या (रोहित्र) बाजूला अदांजे 60 फुटांची लांबी तर 40 खोल खोदाई केल्याने तो खचला होता. दुसरी पर्यायी व्यवस्थाच नसल्याने रोज 20 दशलक्ष मैला 15 ते 20 दिवस मैलामिश्रित पाणी थेट पवना नदीत मिसळत होते. नदी दुषित झाल्याने नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत होता. सध्या प्रकल्प सुरू करण्यात आल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

Back to top button