पिंपरी : बालाजीनगरचा वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी
पिंपरी : बालाजीनगर येथील विस्कळीत झालेला वीजपुरवठा सुरळीत करावा, अन्यथा कार्यालयास टाळे ठोको आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस झोपडपट्टी सेलचे शहराध्यक्ष संतोष निसर्गंध यांनी दिला आहे. याबाबत वीज वितरणच्या भोसरी कार्यकारी अभियंत्यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे, की गेल्या दोन महिन्यांपासून बालाजीनगर पॉवर हाऊस या भागातील विजपुरवठा विस्कळीत झाला आहे.
सकाळी 4 वाजल्यापासून विजपुरवठा बंद केला जातो. त्यामुळे शाळेत जाणारे विद्यार्थी, कामावर जाणारे कामगार व महिला यांना या समस्येचा दररोज सामना करावा लागत आहे. याबाबत अनेक निवेदने देवूनही कोणत्याही प्रकारची कारवाई केलेली नाही. दोन दिवसांत विजपुरवठा सुरळीत न केल्यास टाळे ठोको आंदोलन करण्यात येईल.