राजगुरूनगर : दावडी येथे १५ मोरांचा मुत्यू, कारण अस्पष्ट
राजगुरूनगर ; पुढारी वृत्तसेवा : राजगुरूनगर लोणकरवाडी (दावडी, ता. खेड) येथे १५ मोरांचा मूत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. त्यांचा मुत्यू उष्माघाताने झाला की, विषबाधेने झाला हे स्पष्ट झालेले नाही. प्राथमिक अंदाजानुसार उष्माघाताने या मोरांचा मूत्यू झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे. मात्र वनविभाग व प्रशासकीय सेवेच्या निष्काळजीपणामुळे पक्षीप्रेमी व ग्रामस्थांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
राजगुरूनगर तालुक्याच्या पूर्व भागातील दावडी परिसरातील लोणकरवाडी येथे मोरांचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि. १६) उघडकीस आली. उन्हाचा वाढता तडाखा अथवा काहीतरी खाण्यात आल्याने झालेली विषबाधा हे कारण त्यामागे असू शकते, असा अंदाज व्यक्त होत आहे. दावडी परिसरातील डोंगर परिसरात शेकडो मोर आहेत.
येथील वन परिसरात रविवारी (दि. १७) सकाळी काही मोर तडफडत असल्याचे लक्षात आल्यानंतर दावडीचे पोलिस पाटील आत्माराम डुंबरे, संतोष लोणकर व ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. काही मोरांचा आधीच मूत्यू झाला होता. तडफडणाऱ्या ४ मोरांना नागरिकांनी पाणी पाजुन जीवदान दिले.
कोळशाच्या तुटवड्याबाबत अजित पवारांचे म्हणाले,” राज्य सरकार…” https://t.co/FdBNpPlonfकोळशाच्या-तुटवड्याबाबत-उपमुख्यमंत्री-पवार-म्हणाले-राज्य-सरकार/ar #Pudharionline #Pudharinews #AjitPawar #वीजनिर्मिती
— Pudhari (@pudharionline) April 17, 2022
खेडचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदिप रौधळ, वनपरिमंडळ अधिकारी दत्तात्रय फाफाळे, वनरक्षक सुषमा चौधरी यांनी घटनास्थळी जाऊन मुत्युमुखी पडलेले मोरांचा पंचनामा केला व मृत्यमुखी पडलेल्या मोरांचे आरोग्य विभागामार्फत शवविच्छेदन केले.
अहवाल आल्यानंतर मोरांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे. या परिसरात मोरांना पिण्यासाठी भरपूर पाणी उपलब्ध आहे.विषबाधा झाल्याने त्यांचा मूत्यू झाला असावा, अशी शक्यता ग्रामस्थांनी बोलून दाखविली.
या डोंगर परिसरात अजुन काही मोर मृत्यूमुखी पडल्याचे आढळून येत असून मोरांच्या मूत्यूची संख्या वाढण्याची शक्यता असल्याचे पोलिस पाटील आत्माराम डुंबरे व ग्रामस्थांनी सांगितले.
हेही वाचा :