आळंदी : माऊलींच्या पालखीचे २१ जूनला होणार प्रस्थान
आळंदी : पुढारी वृत्तसेवा : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आषाढी पायी वारी पालखी सोहळा दोन वर्षांनंतर पुन्हा मोठ्या उत्साहात मार्गस्थ होणार आहे. यंदा आळंदी येथून दि. २१ जूनरोजी माउलींच्या पालखीचे प्रस्थान होणार आहे. सोहळा प्रमुख ॲड. विकास ढगे पाटील यांनी ही माहिती दिली आहे.
श्री क्षेत्र पंढरपूर येथील संत ज्ञानेश्वर महाराज मठात आषाढी वारी पायी दिंडी पालखी सोहळा नियोजनाची बैठक पार पडली. त्यात सोहळ्याचे नियोजन करण्यात आले आहे. यंदा तिथी वृद्धी झाल्याने लोणंद, फलटण येथे दोन दिवस मुक्काम वाढला आहे. दिंडीकऱ्यांच्या मागणीवरून संस्थानच्या सही शिक्क्याने यंदा वाहन पास देण्यात येणार आहे.
असा असेल पालखी सोहळा –
आळंदी येथून मंगळवार दि. २१ जून २०२२ रोजी सायंकाळी ४ वाजता श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रस्थान ठेवेल.
– बुधवार आणि गुरुवारी (दि. २३ जून) पुणे येथे मुक्काम
– शुक्रवार, शनिवार (दि. २५) सासवड
– रविवारी (दि. २६) जेजुरी
– सोमवारी (दि. २७) वाल्हे
– मंगळवार व बुधवारी (दि. २९) लोणंद
– गुरुवारी (दि. ३०) तरडगाव
– शुक्रवार व शनिवारी (दि. २ जुलै) फलटण
– रविवारी (दि. ३) बरड
– सोमवारी (दि. ४) नातेपुते
– मंगळवारी (दि. ५) माळशिरस
– बुधवारी (दि. ६) वेळापूर
– गुरुवारी (दि. ७) भंडीशेगाव
– शुक्रवारी (दि. ८) वाखरी
– शनिवारी (दि. ९) श्री क्षेत्र पंढरपुर मुक्कामी
– रविवारी (दि. १० जुलै) आषाढी एकादशीचा महासोहळा पार पडणार आहे.
येथे होणार उभे रिंगण
– चांदोबाचा लिंब
– बाजीराव विहीर
– इसबावी
येथे होणार अश्वांचे गोल रिंगण
– पुरंदावडे (सदशिवनगर)
– पानीव पाटी
– ठाकूरबुवा
– बाजीराव विहीर
हेही वाचलंत का ?