पौड : पुढारी वृत्तसेवा : पुणे शहराला पाणीपुरवठा करणार्या मुळशी तालुक्यातील टेमघर धरणात केवळ पंधरा ते वीस टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. मुळशी तालुक्यातील मुठा खोर्यात लव्हार्डे – टेमघर या ठिकाणी मुठा नदीवर टेमघर धरण बांधण्यात आले आहे. पुणे शहराला कमी पडत असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या पार्श्वभूमीवर हे धरण बांधण्यात आले. मुठा खोर्यात तसेच धरणभागात ऊस किंवा औद्योगिकसाठी पाण्याची मागणी नाही.
यामुळे पुणे शहराला पिण्यासाठी खडकवासला धरणात वरसगाव, पानशेत व टेमघर या धरणांपैकी आधी टेमघर धरणातून पाणी सोडले जाते. त्यानंतर टप्प्याटप्याने पानशेत व वरसगाव धरणातून पाणी सोडले जाते. टेमघर धरणातून काही दिवसांच्या अंतराने पाणी सोडल्याने फेब्रुवारीच्या अखेरीसच या धरणात पंधरा टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. राहिलेल्या मृतसाठ्यात पुढील काही महिने धरण परिसरातील नागरिकांची तहान भागविली जाणार आहे.