पालघर; पुढारी वृत्तसेवा : दोन वर्षे पूर्वी कोरोनाच्या महामारीत लॉकडाऊनच्या काळात समाजाच्या प्रत्येक घटकाला मोठा
फटका बसला. अनेकजणांना कोरानाची लागण झाली. त्यांच्यासोबत त्यांचे कुटुंबीय देखील बाधित झाले. याशिवाय करोनाचा
संसर्ग वाढू नये यासाठी केंद्र सरकारने लॉकडाऊन घोषित केला होता. त्या वेळेस ऑनलाइन व्यवसाय सुरू होता त्याची व्यप्ती वाढल्याने ऑनलाइन व्यवसाय फोफावत चालला आहे त्याची झळ आजही शेकडो दुकानदार सोसताना दिसत आहेत. दुकानांमध्ये अजूनही व्यवसाय थंड असल्याचा पाहवयास मिळत आहे.
सणासुदीच्या वेळेस निर्बधमुक्त सण होण्याचा आनंद अनेक व्यवसायिकांना झाला मात्र हवी तशी उलाढाल न झाल्याने व्यापारीवर्ग चिंतेत
असल्याचे पहावयास मिळत आहे. त्यातच अनेकजण ऑनलाईनच्या खरेदीला प्राधान्य देत असल्याने लहान व्यवसायिक संकटात सापडले आहेत. निर्बधमुक्त सण उत्सव होत आहेत. व्यवसाय सुरळीत सुरू होत आहे मात्र, तरीदेखील छोट्या दुकानदारांपुढील आव्हाने काही कमी होताना दिसत नाहीत. कोरोना काळात ऑनलाईन शॉपिंगची संकल्पाना जास्त दृढ झाली आहे. ऑनलाईन शॉपिंगवर ग्राहकांना अनेक ऑफरही असतात.
अनेक वस्तूवर सूट देण्यात येत असल्याने अनेक तरुण, तरुणींसह वयोवृद्ध नागरिक ही सहज मोबाईलवरून ऑनलाईन साहित्य खरेदी करत असल्याने शहरातील लहान व्यवसायिक यांना त्याचा फटका बसला आहे. त्यातच शाळा ही परिपूर्ण भरत आहेत. स्टेशनरी, साहित्य, पेन, वह्या, पुस्तके, कंपासपेटी आदी साहित्याला ग्राहक येत असतात मात्र अनेकदा शाळेतील विद्यार्थ्यांना अनेक संघटना वह्या दप्तर पेन साहित्य चे वाटप करत असतात त्याची झळ सुद्धा व्यवसाईक यांना सोसावी लागत आहे.