Palghar Fatal Accident : मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांची मदत : पालकमंत्री गणेश नाईक

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर धानीवरी गावाच्या हद्दीत झालेल्या भीषण अपघातात १३ ठार
Mumbai Ahmedabad Highway Accident
Mumbai Ahmedabad Highway Accident Pudhari
Published on
Updated on

Mumbai Ahmedabad Highway Accident

पालघर: शासन जखमींच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. जखमी पूर्णपणे बरे होईपर्यंत त्यांच्या उपचारांची संपूर्ण जबाबदारी शासन घेईल, तसेच अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी पाच लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आल्याची माहिती वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी दिली.

यावेळी खासदार डॉ. हेमंत सवरा, जिल्हाधिकारी मनोज रानडे, जिल्हा पोलिस अधीक्षक यतीश देशमुख, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रामदास मराड तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Mumbai Ahmedabad Highway Accident
Palghar Fatal Accident | साखरपुड्यासाठी निघालेल्या वऱ्हाडाच्या ट्रकचा भीषण अपघात ; 13 ठार, 30 हून अधिक गंभीर जखमी

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर धानीवरी गावाच्या हद्दीतील गेटीपाडा येथे झालेल्या अपघातानंतर प्रशासनाने तातडीने मदतकार्य सुरू करत जखमींना वेळीच उपचार उपलब्ध करून दिला. अपघाताची माहिती मिळताच जिल्हा प्रशासन, पोलीस, आरोग्य विभाग आणि स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य युद्धपातळीवर राबविले.

या पार्श्वभूमीवर वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री नाईक यांनी वेदांत हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या जखमींची भेट घेत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी त्यांनी डॉक्टर आणि प्रशासनाकडून उपचार व्यवस्थेची माहिती घेत जखमींना सर्वोत्तम वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना पालकमंत्री गणेश नाईक यांनी दिल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news