मी असताना राज ठाकरे यांची महायुतीला गरज नाही | Ramdas Athawale

रामदास आठवले : राज ठाकरे यांचे स्वप्न भंग झाले आहे
नाशिक
मी असताना राज ठाकरेंची गरजच काय? असं रामदास आठवले स्पष्ट बोललेPudhari News network
Published on
Updated on

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क - मी असताना राज ठाकरे यांची महायुतीला गरज नाही असे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी म्हटले आहे. राज यांची निवडणुकीत हवा गेली, त्यांना वाटायचे माझ्याशिवाय सत्ता येणार नाही मात्र त्यांचे स्वप्न भंग झाले आहे असेही आठवले नाशिक येथे पत्रकार परिषदेत म्हटलं आहे.

पत्रकारांशी संवाद साधताना रामदास आठवले म्हणाले की, भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची ही महायुती आहे. या मुख्य ताकदीला मदत करणारी आरपीआयची ताकद आहे. मी राज्यसभेचा खासदार असलो तरीही, लोकसभेचा माणूस आहे. त्यामुळे रिपब्लिकन पक्षाला जागा देणे आवश्यक आहे.

मी असताना राज ठाकरे यांची आवश्यकता नाही, असे माझे मत आहे. राज ठाकरे महाराष्ट्रातील लोकप्रिय नेते आहेत. परंतु, ते महायुतीत येणार नाहीत. ते आले तरी त्यांना घेऊ नये असे माझे मत आहे. असे रामदास आठवले यांनी लोकसभा निवडणुकीच्या काळातही असेच वक्तव्य केले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news