नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शहरातील बांधकाम व्यावसायिक हेमंत पारख यांच्या अपहरणाच्या घटनेस सहा दिवस उलटले असून, अद्याप पोलिसांनी या गुन्ह्यातील अपहरणकर्त्यांना पकडलेले नाही. त्यामुळे अपहरणाच्या घटनेची उकल होत नसल्याने अनेक चर्चा रंगत आहेत. पोलिसांची दोन पथके परराज्यात ठाण मांडून असून, त्यांनी अपहरणकर्त्यांची ओळख पटवल्याची चर्चा आहे.
पारख यांचे शनिवारी (दि. २) रात्री त्यांच्या घरासमोरून अज्ञात व्यक्तींनी अपहरण केले. अपहरणाच्या आठ तासांनंतर अपहरणकर्त्यांनी पारख यांना बलसाड येथे सोडून पळून गेले. पारख यांनी नातलगांशी संपर्क साधून रविवारी दुपारी घर गाठले. मात्र, अपहरणकर्त्यांनी पारख यांच्याकडील दागिने, रोकड न नेल्याने तो चर्चेचा विषय होता. तसेच पारख यांच्याकडून अपहरणकर्त्यांबद्दल ठोस माहिती न मिळाल्याने पोलिसांनीही तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्हीच्या आधारे तपास करत आहे. संशयितांना अटक केल्यानंतरच या अपहरणाचे कारण उकलण्यास मदत होणार आहे. त्यामुळे शहर गुन्हेशाखांचे विविध पथके गेल्या सहा दिवसांपासून गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेशात ठाण मांडून आहेत. यातील काही पथकांच्या हाती अपहृत संशयितांचे धागेदोरे लागल्याची चर्चा आहे.
हेही वाचा :