सिन्नर: कणकोरी शिवारात शुक्रवारी (दि.२०) रात्रीच्या सुमारास बुचकूल यांच्या वस्तीवर बिबट्याच्या हल्ल्यात वासरू, तर शनिवारी (दि. २१) नांदूरशिंगोटे वावी रस्त्यालगत असलेल्या सानप वस्तीवर बिबट्याने मेढपाळांच्या कळपावर हल्ला करत कोकरू ठार केल्याची घटना घडली.
कणकोरी गावाबाहेर जामनदीजवळील असलेल्या रामनाथ बुचकूल यांच्या वस्तीवर घराशेजारच्या पडवीत गाय व वासरू बांधलेले होते. रात्रीच्या वेळी बिबट्याने पडवीत शिरून वासरावर हल्ला केला. जनावरांच्या आवाजाने बुचकूल कुटुंबीय जागे झाले. मात्र बिबटधाने जवळच असलेल्या शेतात वासराला ओढून नेत त्याचा फडशा पाडला.
ही घटना ताजी असतानाच नांदूरशिंगोटे वावी रस्त्यालगत संकेत सानप यांच्या वस्तीजवळील तुकाराम रामनाथ जाधव यांच्या शेळ्या मेंढ्यांच्या कळपावर हल्ला करत बिबट्याने कोकरू फस्त केले. सानप यांनी घटनेची माहिती दिल्यानंतर वनविभागाच्या कर्मचाप्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.
खंबाळे शिवारातही गेल्या १५ ते २० दिवसांपासून बिबट्यांचा मुक्त संचार आढळल्याने पशुपालक, शेतकरी, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वनविभागाने गेल्या तीन दिवसांपासून परिसरात पिंजरा लावला आहे. दररोज सायंकाळी गावातील व वाडी- वस्त्यांवरील पशुपालकांना, शेतकऱ्यांना, ग्रामस्थांना सायरन वाजवून, भॉम्याद्वारे दवंडी देऊन सतर्क राहण्याचे आवाहन सरपंच मीननाथ डावरे आणि पोलिसपाटी भारत बोराडे यांच्यासह वनविभागाचे कर्मचारी करत आहेत.
पशुधनावर वाढलेल्या बिबट्याच्या हल्ल्यांनंतर बंदोबस्तासाठी पिंजरा लावण्याची मागणी केली गेली. त्यानंतर वनविभागाने पिंजरा तैनात केला आहे. तथापि, दोन वेगवेगळ्या भागांत बिबट्यांचा मुक्त संचार असल्यामुळे आणखी पिंजरा लावण्याची मागणी सरपंच शिवानी माळवे यांनी वनविभागाकडे केली आहे.