Nashik Nandini River Flood | 'नंदिनी'ने ओलांडली धोक्याची पातळी

Nashik Nandini River Flood | नाशिक शहरातून वाहणाऱ्या नदीला पूर; पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद, नागरिकांची धावपळ
Nandini River
Nandini River Pudhari
Published on
Updated on

नाशिक शहरातून वाहणाऱ्या नंदिनी नदीला मोठा पूर आल्याने नदीकाठच्या नागरिकांची मोठी धावपळ उडाली आहे. नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे नदीवरील बहुतांश पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आले होते. सातपूर येथील महादेववाडी पूल पूर्णपणे पाण्याखाली गेल्याने सातपूर ते मौले मळा हा मार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करावा लागला.

Nandini River
Monsoon Safety Alert : पर्यटकांना 'नो एन्ट्री'! ३ सप्टेंबरपर्यंत ठाणे जिल्ह्यातील धबधबे, धरणे आणि नदीकाठ बंद

बुधवारी (दि. ८) झालेल्या मुसळधार पावसामुळे मळे व शेत परिसरातील पावसाच्या पाण्याचा मोठा प्रवाह नंदिनी नदीपात्रात आला. पिंपळगाव खांब परिसरात पुलाचे काम सुरू असल्याने त्या ठिकाणीही पाण्याचा प्रवाह अधिक वेगाने होता. नदीतील वाढलेले पाणी सर्वप्रथम महादेववाडी येथील पुलावरून वाहू लागल्याने महादेववाडी परिसराला धोक्याचा इशारा देण्यात आला.

नदीकाठच्या घरांना पाण्याचा धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने तत्काळ नदीकाठच्या लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या होत्या. महादेववाडी पूल बंद झाल्यामुळे मळे परिसर आणि सातपूर गाव यांचा थेट संपर्क तुटला असून, नागरिकांना त्र्यंबक रोडमार्गे मोठा वळसा घालून प्रवास करावा लागला. सुदैवाने सायंकाळी पावसाचा जोर कमी झाल्यानंतर नदीचे पाणी ओसरले.

पूरपरिस्थिती आणि वाहतुकीवर झालेला परिणाम:

  • धोक्याची पातळी पार: मुसळधार पावसामुळे नंदिनी नदीने धोक्याची पातळी ओलांडली, ज्यामुळे नदीकाठच्या रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले.

  • मार्ग बंद: सातपूर येथील महादेववाडी पूल पाण्याखाली गेल्याने सातपूर ते मौले मळा हा थेट संपर्क मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला.

  • नागरिकांना वळसा: पूल बंद झाल्यामुळे मळे परिसर आणि सातपूर गावचा संपर्क तुटला. नागरिकांना पर्यायी मार्ग म्हणून त्र्यंबक रोडने मोठा वळसा घेऊन प्रवास करावा लागला.

  • काम सुरू असलेल्या ठिकाणी वेग: पिंपळगाव खांब परिसरात पुलाचे काम सुरू असलेल्या भागात पाण्याचा वेग प्रचंड होता.

Nandini River
Kalyan-Dombivli Heavy rain: महापुराचा धोका! उल्हास नदीने ओलांडली धोक्याची पातळी; २०० हून अधिक लोकांचे तातडीने स्थलांतर
  • उंची वाढवूनही पाणी पुलावरून: नगरसेविका सुवर्णा मोराळे यांच्या प्रयत्नातून काही वर्षांपूर्वी महादेववाडी पुलाची उंची वाढविण्यात आली होती, ज्यामुळे पूरपरिस्थितीचा धोका कमी झाला होता. मात्र, यंदा पावसाचा जोर अत्यंत तीव्र असल्याने पाणी पुन्हा पुलावरून वाहू लागले.

  • प्रवाहाला अडथळा: पुलाखाली मोठ्या प्रमाणात गाळ व कचरा साचल्याने पाण्याचा निचरा होण्यास अडथळा निर्माण झाला असावा, अशी शंका स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.

पूर ओसरल्यानंतरची परिस्थिती

  • कचऱ्याचे ढीग: पूर ओसरल्यानंतर प्रवाहाच्या पाण्यासोबत वाहून आलेला कचरा मोठ्या प्रमाणात नदीकाठी अडकून पडला आहे.

  • चिखल आणि गाळ: पुलावरून पाणी वाहून गेल्यामुळे संपूर्ण पुलावर मोठ्या प्रमाणावर गाळ व चिखल साचला आहे.

  • प्रशासनाचा इशारा: चिखलामुळे पुलावरून प्रवास करणे अत्यंत धोकादायक बनले असून, प्रशासनाकडून वाहनधारकांना खबरदारी घेण्याचे व काळजीपूर्वक वाहन चालवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news