जळगाव : पुढारी वृत्तसेवा – शहरातील तहसील कार्यालयात गुरुवार (दि.१३) रोजी झालेल्या पावसामुळे कचेरीमध्ये पाणी साचले. प्रवेशव्दारापासून तहसीलदारांच्या दालनापर्यंत पाणीच पाणी झालेले पहावयास मिळत आहे. तरी तहसीलदार म्हणतात आमचे दस्ताऐवज सुरक्षित आहेत.
पावसाळ्यास सुरुवात झालेली असतानाही तहसील कार्यालयातील ड्रॅनेट सिस्टीम अजूनही दुरुस्त करण्यात आलेली नाही. त्यामुळे गुरुवार (दि.१३) रोजी झालेल्या पावसामुळे तहसील कार्यालयाच्या आवाराला तलावाचे स्वरुप प्राप्त झालेले आहे. तहसील कार्यालयातील तहसीलदारांच्या दालनापर्यंत पाणी घुसले आहे.
शहरातील सर्व महत्त्वाचे कागदपत्र दस्ताऐवज याच तहसील कार्यालयात ठेवण्यात आलेले आहेत. तहसील कार्यालयाच्या सर्व विभागात पाणी शिरत असेल तर नागरिकांचे ठेवलेले दस्तऐवज पाण्याने खराब होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वास्तविक पाहता तहसील कार्यालयाचा भाग खोलगट भागात विस्थापित झाला असून आजूबाजूच्या भागात रस्ते व उंच भाग झाल्यामुळे संपूर्ण भागातील पाणी तहसील कार्यालयातच जमा होते. त्यामुळे तहसील कार्यालयाला पावसाळ्यात तलावाचे स्वरूप प्राप्त होत आहे.
तहसील कार्यालयाच्या आवारात येणारे पाणी ड्रेनेज होण्यासाठी वेळ लागत असल्याचे सांगण्यात येत आहे. ड्रेनेजची साफसफाई करून घेण्यात आलेली आहे. तसेच महानगरपालिका व पीडब्ल्यूडी यांच्याशी देखील चर्चा करण्यात आल्याचे तहसीलदार यांनी सांगितले. तहसील कार्यालयातील महत्त्वाचे दस्तावेज हे सुरक्षित आहेत. – शीतल राजपूत, तहसीलदार.
हेही वाचा: