जळगाव : शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळण्याचे मीनल करनवाल यांचे आवाहन

Zilla Parishad Jalgaon | रासायनिक शेतीमुळे आरोग्यावर दुष्परिणाम
जळगाव
जिल्हा परिषदेच्या साने गुरुजी सभागृहात मिशन संजीवनी बद्दल माहिती देताना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल. (छाया : नरेंद्र पाटील )
Published on
Updated on

जळगाव : "अत्याधिक रासायनिक खतांच्या वापरामुळे जमिनीची पोत खराब होतेच, शिवाय याचा थेट परिणाम मानवाच्या आरोग्यावरही होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळावे," असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी केले.

जिल्हा परिषदेच्या साने गुरुजी सभागृहात शुक्रवार (दि.4) रोजी आयोजित पाणी फाऊंडेशनच्या फार्मर कप बक्षीस वितरण कार्यक्रमात करनवाल बोलत होत्या. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक आर.एस. लोखंडे, एग्रोवर्डचे शैलेंद्र चव्हाण तसेच गटशेती करणाऱ्या महिलांचे समूह उपस्थित होते. करनवाल यांनी सांगितले की, "शेती ही निसर्गावर आधारित असून त्यात अनेक धोके असतात. तरीही शेतकऱ्यांनी नवकल्पना स्वीकारून शेतीत नवे प्रयोग करावेत. आज पाणी ही संपणारी गोष्ट आहे. त्यामुळे पाण्याचा जपून वापर, साठवणूक आणि जमिनीत रुजवणूक आवश्यक आहे."

जळगाव
Zilla Parishad Jalgaon | जि. प. चे "मिशन संजीवनी" : भूजल पातळी वाढवण्यासाठी पाऊल

जिल्हा परिषदेने सुरू केलेल्या 'मिशन संजीवनी' या उपक्रमांतर्गत ‘पाणी आडवा, पाणी जिरवा’ सारखे उपक्रम राबवले जाणार असून, त्यात पुढाकार घेणाऱ्या शेतकरी गटांना वॉटर कपच्या धर्तीवर बक्षीस देण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

गटशेतीतील महिलांचा सन्मान

कार्यक्रमात धरती माता शेतकरी गट, रोटवद शेतकरी गट, शंभू महिला शेतकरी गट, गायत्री महिला शेतकरी गट यांना उल्लेखनीय कामगिरीबद्दल गौरविण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news