मुंबई विभागात ८,६२९ गुन्ह्यांची नोंद झाली असून ८,६२४ व्यक्तींना अटक करून एकूण ९४ लाख ७७ हजार दंड वसूल करण्यात आला आहे. नागपूर विभागात २,७३४ गुन्हे दाखल करून २,७३१ व्यक्तींना अटक, रु.२७.६१ लाखचा दंड वसूल करण्यात आला आहे. पुणे विभागाच्या रेल्वे संरक्षण दलाने १,८५६ गुन्हे नोंदवले, १,८५५ व्यक्तिंना अटक केली आणि १२ लाख ७१ हजार दंड वसूल केला.