मुंबई : विधान परिषदेच्या ११ जागांसाठी येत्या १२ जुलै रोजी निवडणूक होणार असून त्यासाठी आज २५ जूनपासून अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. त्यामुळे अर्ज भरण्यासाठी इच्छुकांची लगबग सुरू होणार असून २ जुलैपर्यंत उमेदवारांना अर्ज भरता येणार आहे.
विधान परिषदेतील भाजपचे चार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे गटाचे प्रत्येकी एक, काँग्रेसचे दोन, तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, राष्ट्रीय समाज पक्ष आणि शेतकरी कामगार पक्षाचे प्रत्येकी एक अशा एकूण ११ आमदारांची मुदत येत्या २७ जुलै २०२४ रोजी संपत आहे. त्यामुळे ही निवडणूक होत आहे. या पार्श्वभूमीवर विधानमंडळ सचिवालयाने या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत : २ जुलै
उमेदवारी अर्जाची छाननी : ३ जुलै
उमेदवारी अर्ज माघारीची मुदत : ५ जुलै
मतदान : १२ जुलै (सकाळी ९ ते संध्याकाळी ४ वाजेपर्यंत)
मतमोजणी : १२ जुलैला संध्याकाळी पाचपासून
भाजप : विजय गिरकर, नीलय नाईक, रमेश पाटील, रामराव पाटील
काँग्रेस : डॉ. वजाहत मिर्जा, डॉ. प्रज्ञा सातव
शिवसेना शिंदे गट : डॉ. मनीषा कायंदे
शिवसेना ठाकरे गट : अनिल परब
राष्ट्रवादी अजित पवार गट : बाबाजानी दुर्राणी
राष्ट्रीय समाज पक्ष : महादेव जानकर
शेकाप : जयंत पाटील