

मुंबई : मराठी नाट्य क्षेत्रातील दिग्गज असलेल्या जेष्ठ रंगकर्मी विजया बाई मेहता यांचे निधन झाले आहे. मराठी रंगभूमीसाठी ही अतिशय दुःखद घटना आहे. नाट्यक्षेत्रातील ज्येष्ठ आणि श्रेष्ठ दिग्दर्शिका असलेल्या विजया मेहता ह्यांचं त्यांच्या राहत्या घरीच दुःखद निधन झालं आहे. वयाच्या ९२ वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. नाना पाटेकर , विक्रम गोखले , निना कुलकर्णी , स्वाती चिटणीस यांच्या त्या गुरू होत्या. ‘विजयाबाई’ या नावाने त्या परिचीत होत्या.
१९६० च्या दशकात त्यांनी विजय तेंडूलकर, अरविंद देशपांडे आणि श्रीराम लागू यांच्यासोबत रंगायन या संस्थेची स्थापना केली. या संस्थेने प्रायोगिक रंगभूमीची चळवळ मराठी भाषेत सुरू केली. पार्टी या चित्रपटातील त्यांची भूमिका गाजली. त्यांनी दिग्दर्शित केलेले पेस्तनजी व रावसाहेब हे चित्रपट विशेष मानले जातात. रावसाहेब, पेस्तनजी हे हिंदी चित्रपट तसेच स्मृतिचित्रे ही मराठी टेलिफिल्म विजया बाईंनी दिग्दर्शित केली आहेत. झिम्मा हे त्यांच आत्मचरित्रही प्रसिद्ध आहे.
मराठी रंगभूमीवर विविध प्रयोग करणाऱ्या अभिनेत्री, दिग्दर्शिका अशी विजया मेहता यांची ओळख होती. सुमारे 60 वर्षे त्या रंगभूमीवर वावरत होत्या दिल्लीतील नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा येथे अलकाजी यांच्या तालमीत तयार झालेल्या विजया मेहता मुंबईत एक वेगळे आयाम देत मराठी रंगभूमीवरील सर्वाधिक महत्त्वाचे योगदान देणाऱ्या दिग्दर्शिका ठरल्या असे म्हणता येईल.
संध्याछाया या जयवंत दळवी यांच्या नाटकापासून तर विविध भूमिका करण्यास त्यांचा हातखंडा होता नाटकात काम करताना दिग्दर्शिका म्हणून त्यांनी अभिनेत्यांची एक पिढीच महाराष्ट्रात घडवली. आंतरराष्ट्रीय रंगभूमीचा अभ्यास हे विजया मेहता यांचे आणखी एक वैशिष्ट्य जर्मन रंगभूमीवर महिलाचा दगड ठरलेल्या पीटर बुक्स यांच्या यांच्या महाभारता विषयी विजया मेहता कायम वेगळे आयाम समजावून सांगत असत.
गेले काही दिवस त्या स्मृतीची शिकार झाल्या होत्या त्यामुळे रंगभूमीवरील त्यांचा वावरही कमी झाला होता मात्र मराठी रंगभूमीवर उत्तम दिग्दर्शका म्हणून त्यांनी अनेक महत्त्वाच्या नाटककारांच्या संहिता प्रेक्षकांपर्यंत पोहोचवल्या. गिरीश कर्नाड यांची ह्रदयवदन महेश यांच्या पार्टी अशा विविध नाटकांना त्यांचा स्पर्श झाला होता. आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांनी अभिनेते आणि दिग्दर्शकांना तयार करणाऱ्या कार्यशाळा ही ठिकठिकाणी आयोजित केल्या होत्या.
डॉक्टर श्रीराम लागू विजय तेंडुलकर यांच्या काळापासून सुरू झालेल्या या अभिनेत्रीचा प्रवास आज त्यांच्या मृत्यूनंतरच थांबला. विजया मेहता यांच्यासारखी मराठी रंगभूमीचा साकल्याने विचार करणारी व्यक्ती गेल्या शतकाची मराठी संस्कृतीची ठेव होती, असे म्हणणे अयोग्य होणार नाही. कालांतराने सिनेमाच्या क्षेत्रात गेल्यानंतर त्यांनी रावसाहेब पेस्टन जी असे उत्तम चित्रपटही निर्माण केले. रावसाहेब हा जयवंत दळवी यांच्या बॅरिस्टर या नाटकावर आधारलेला चित्रपट होता. नसिरुद्दीन शहा, अनुपम खेर अशा हिंदी रंगभूमीवरील महत्त्वाच्या कलाकारांनीही त्यांच्या हाताखाली काम केले. बाई हे नाव घेताच त्यांच्याबद्दल आदर असलेल्या अनेक पिढ्या आज रंगभूमीवर वावरत आहेत.