Sanjay Raut Narakatla Swarg book | संजय राऊत पाकिस्तानसारखेच, गुन्हे करायचे आणि...; संदीप देशपांडेंची टीका

Sandeep Deshpande on Sanjay Raut | खासदार संजय राऊत यांच्या 'नरकातला स्वर्ग' या तुरुंगातील अनुभवांवर आधारित पुस्तकाचे आज प्रकाशन होत आहे. यावरून मनसे नेते संदीप देशपांडे यांनी तीव्र शब्दांत निशाणा साधला आहे.
Sanjay Raut Narakatla Swarg book
Sanjay Raut Narakatla Swarg bookfile photo
Published on
Updated on

Sanjay Raut Narakatla Swarg book |

मुंबई : "संजय राऊत हे पाकिस्तान सारखे आहेत, गुन्हे करायचे आणि ‘व्हिक्टिम कार्ड’ खेळायचं," अशी टीका मनसे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांच्यावर केली आहे. राऊत यांनी तुरुंगात लिहिलेल्या 'नरकातला स्वर्ग' या पुस्तकाचे आज प्रकाशन होत आहे. यात अनेक गौप्यस्पोट आहेत. यावरून देशपांडेंनी राऊत यांच्यावर निशाना साधला.

...स्वातंत्र सैनिक म्हणून जेलमध्ये नव्हता गेला

पुस्तक प्रकाशनाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधताना मनसेप्रमुख राज ठाकरेंबद्दल नाराजी व्यक्त केली. तुरुंगात गेल्यानंतर राज ठाकरे यांनी एक तरी फोन करायला पाहिजे होता, अशी खंत राऊत यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, मनसेचे संदीप देशपांडे यांनी एक्सवर लिहिलेल्या पोस्टमध्ये राऊत यांच्यावर टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, "संजय राऊत हे पाकिस्तान सारखे आहेत, गुन्हे करायचे आणि 'victim card 'खेळायचं. तुम्ही काय स्वातंत्र्य सैनिक म्हणून जेल मध्ये नव्हता गेला, आर्थिक घोटाळ्याच्या आरोपाखाली गेला होता."

राऊतांच्या 'नरकातला स्वर्ग' पुस्तकाचे आज प्रकाशन

खासदार संजय राऊत यांना एका जमीन प्रकरणात ईडीने अटक केल्यानंतर आर्थर रोड येथील तुरुंगात तीन महिने राहावे लागले होते. तुरुंगात असताना आलेल्या अनुभवांवर आधारित त्यांनी लिहिलेल्या 'नरकातला स्वर्ग' या पुस्तकाचे आज प्रकाशन आहे. या प्रकाशन सोहोळ्याला ज्येष्ठ पटकथाकार लेखक जावेद अख्तर, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

राज ठाकरेंनी फोन करायला पाहिजे होता

पुस्तकात राऊत म्हणाले आहेत की, राज ठाकरे माझे चांगले मित्र होते, त्यांचे आणि माझे चांगले संबंध होते. राजकारण जरी वेगळे झाले तरी संकटकाळात घरच्यांना, कुटुंबाला दिलासा देणारा एखादा फोन जरी गेला तरी एक आधार असतो की कुणीतरी आपल्यासोबत आहे. कारण ज्या पद्धतीने आमच्यावरती संकटांचा पहाड कोसळला होता, व्यक्तिशः नव्हे तर कुटुंबावर, तेव्हा एक काडीचाही आधार असतो, कुणीतरी फुंकर मारते ते महत्त्वाचे असते, असेही राऊत म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news