Pahalgam Attack | हनीमूनसाठी गेलेले मुंबईचे नवदाम्पत्य पहलगाम हल्ल्यातून कसे बचावले ?

Pahalgam Attack | मुंबईत परतले; आ. मनिषा चौधरीची निर्णायक भूमिका
Thakur couple rescued from Pahalgam Attack
Thakur couple rescued from Pahalgam AttackOnline Pudhari
Published on
Updated on

Thakur couple rescued from Pahalgam Attack

मुंबई: जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर अडकलेले दहिसरचे ठाकूर कुटुंब आज मुंबईत सुखरूप परतले. त्यांच्या सुरक्षित परतीसाठी भाजप आमदार मनिषा चौधरी यांनी तात्काळ पुढाकार घेत निर्णायक भूमिका बजावली.

Thakur couple rescued from Pahalgam Attack
Pahalgam terror attack : बारामती दूध संघाचे संचालक मंडळ अडकले काश्मीरमध्ये

परतीनंतर आमदार चौधरी यांनी ठाकूर कुटुंबियांच्या दहिसर येथील निवासस्थानी जाऊन त्यांची विचारपूस केली. ठाकूर कुटुंबातील प्रणय महादेव ठाकूर आणि मनाली प्रणय ठाकूर हे नवविवाहित दांपत्य हनीमूनसाठी पहलगाममध्ये गेले होते.

याचवेळी दहशतवाद्यांनी घडवून आणलेल्या भ्याड हल्ल्यात अनेक पर्यटकांचे प्राण गेले. या घटनेनंतर ठाकूर कुटुंब चिंतेत होते. मनाली यांच्या वडिलांनी आमदार मनिषा चौधरी यांच्याशी संपर्क साधत मदतीची विनंती केली.

Thakur couple rescued from Pahalgam Attack
PM Narendra Modi: दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल अशी शिक्षा त्यांना देऊ...

घटनेची तीव्रता लक्षात घेऊन आमदार चौधरी यांनी त्वरित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अन्य संबंधित अधिकाऱ्यांशी समन्वय साधून मदतीसाठी आवश्यक उपाययोजना केल्या. त्यांच्या जलद पाठपुराव्यामुळे ठाकूर दांपत्य २४ एप्रिल रोजी सकाळी सुखरूप मुंबईत पोहोचले.

या संवेदनशील प्रसंगी आमदार चौधरींच्या तत्पर आणि धाडसी कृतीचे दहिसरमधून सर्वत्र कौतुक होत आहे. कुटुंबीयांनीही त्यांचे आभार मानत, "सरकार आमच्या सोबत खंबीरपणे उभे आहे," असे म्हणत समाधान व्यक्त केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news