Mumbai Water Cut: ऑगस्ट २०२७ अखेरपर्यंत जलसाठा पुरावा म्हणून कपात सुरूच राहणार!

मुंबईतील सात तलावांमध्ये ९५.५३% पाणीसाठा असूनही ऑगस्ट २०२७पर्यंत नियोजनासाठी १०% पाणी कपात सुरूच ठेवण्यात आली आहे. ३१ ऑगस्टला आढावा घेऊन निर्णय होणार.
Thane Water Cut
Thane Water Cut(Pudhari File Photo)
Published on
Updated on

मुंबई: तलावामध्ये ९५ टक्के पाणीसाठा झाला असला तरी, ऑगस्ट २०२७ पर्यंत मुंबईकरांना पाणी पुरवण्याचे नियोजन करण्याचे निर्देश राज्याच्या जलसंपदा विभागाने दिले होते. त्यामुळे सध्याचा पाणीसाठा लक्षात घेऊन, शहरात सुरू असलेली दहा टक्के पाणी कपात सुरू ठेवण्यात आल्याचे पालिकेकडून स्पष्ट करण्यात आले.

Thane Water Cut
Mumbai FDA Action: मुंबईतील चार हॉटेल-रेस्टॉरंटचे परवाने निलंबित

गेल्या १५ मे पासून लागू करण्यात आलेली १० टक्के पाणी कपात मुंबईत सुरू ठेवण्यात आली असून ही कपात मुंबई शहर उपनगरात नसून मुंबई लगतच्या भिवंडी व अन्य महानगरपालिका तसेच ग्रामपंचायतीला देण्यात येणाऱ्या पाणीपुरवठ्यामध्येही कपात करण्यात आली आहे. मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमध्ये २८ ऑगस्टपर्यंत ९५.५३ टक्के पाणीसाठा आहे.

Thane Water Cut
Mumbai Metro 7A Project: २६० कोटींची मेट्रो मार्गिका तोडावी लागणार? सल्लागाराचा दोष असल्याचे एमएमआरडीएकडून स्पष्टीकरण

तो ऑगस्ट २०२७ अखेरपर्यंत पुरवण्यासाठी ३१ ऑगस्ट रोजी सातही तलावातील पाणीसाठ्याचा आढावा घेऊन, पाणी कपात रद्द करायची की नाही, याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे पालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. त्यामुळे सध्या तरी पाणी कपात रद्द करण्याचा महापालिकेचा कोणताही विचार नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news