![मुख्यमंत्री उद्धव ठाकरे](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2022%2F03%2F%E0%A4%89%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%B5-%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%87.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
मुंबई; पुढारी वृत्तसेवा : देशातील संपूर्ण बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या पोहरादेवी या तीर्थक्षेत्राच्या विकास कामास गती द्यावी आणि त्याचा कालबध्द आढावा घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत दिले आहेत.
पोहरादेवी येथील महंतांनी आज शुक्रवारी (दि.१७) रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यामध्ये महंत बाबू सिंग राठोड, मेहताब सिंग नाईक, अॅड अभय राठोड, पोपट चव्हाण व बंजारा समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते.
त्यावेळी मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, पोहरादेवी तीर्थक्षेत्राचे काम रखडता कामा नये. वेळच्या वेळी यासाठी निधी दिला जात असला तरी कालबध्द रितीने कामे पूर्ण करून घ्यावीत आणि तीर्थक्षेत्राच्या विकास कामास अधिक गती द्यावी असे निर्देश प्रशासनाला दिले. यावेळी मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, प्रधान सल्लागार सिताराम कुंटे, प्रधान सचिव विकास खारगे आदींची उपस्थित होते.
हेही वाचलंत का?