![नव्या वर्षात चार मोठे प्रकल्प मुंबईकरांच्या सेवेत !](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2023%2F10%2F33.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
मुंबई : रस्ते, रेल्वे असो वा हवाई वाहतूक, मुंबईकरांच्या नशिबी कोंडी ही ठरलेलीच. पण नव्या वर्षांत या कोंडीतून मुंबईकरांची बऱ्यापैकी सुटका होण्याची शक्यता आहे. पुढील वर्षात होणाच्या लोकसभा निवडणुकीआधीच मुंबईचा चेहरामोहरा बदलणारे चार मोठी प्रकल्प मुंबईकरांच्या सेवेत रूजू होवू घातले आहेत
सुमारे ८२ हजार कोटी रुपये खर्चून उभारण्यात येणाऱ्या मुंबई ट्रान्सहार्बर लिंक, कोस्टल रोड मुंबई मेट्रो लाईन – ३ व नवी मुंबई विमानतळ या चार प्रकल्पांचे काम अंतिम टप्प्यात आहे. नव्या वर्षात ते सार्वजनिक सेवेत येतील. मुंबईच्या विकासाला चालना देणाऱ्या या प्रकल्पांमुळे मुंबईतील घरांच्या किमती दुपटीने वाढतील, अशी शक्यता व्यक्त होत आहे.
२०२४ हे निवडणुकीचे वर्ष आहे. त्या पार्श्वभूमीवर सरकारसाठी हे चारही प्रकल्प अतिशय महत्वाचे आहेत. यामुळे ते नियोजित वेळेत
पूर्ण करण्यासाठी शासनाकडून विशेष मदत केली जात आहे. दुसरीकडे, येत्या ३ ते ५ वर्षात मुंबईला इतर शहरांशी जोडणाऱ्या आणखी काही प्रकल्पांची भर पडणार आहे. यात मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेनचाही समावेश आहे. हे प्रकल्प कार्यरत झाल्यावर मुंबईतील
पायाभूत सेवांमध्ये भर पडून मुंबईकरांचे राहणीमान उंचावणार आहे..