नवी मुंबई, पुढारी वृत्तसेवा : सोमवारी (दि. 8) नवी मुंबई, ठाणे आणि पनवेलसह कोकणला पावसाने झोडपून काढले. त्यामुळे रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर परिणाम होऊन मुंबईकरांचे जनजीवन विस्कळीत झाले. दरम्यान, मंगळवारी (दि. 9) सुद्धा अतिवृष्टी होईल असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. प्राप्त झालेल्या इशाऱ्यास अनुसरून मुलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनांच्या सर्व शाळा मंगळवारी बंद ठेवण्यात येतील असे आदेश पालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी जारी केला आहे.