![लोकांत प्रचंड चीड; ‘ईडी’चे प्रयोग थांबवा : गजानन कीर्तीकर](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2024%2F04%2FGajanan-Kirtikar.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
मुंबई : 'ईडी'बद्दल लोकांच्या मनात प्रचंड चीड निर्माण झाली आहे. त्यामुळे आता 'ईडी'चा वापर थांबवा, असे आवाहन शिवसेना खासदार गजानन कीर्तीकर यांनी केले आहे. कीर्तीकर यांचे पुत्र अमोल यांची कोव्हिड काळात मुंबई महापालिकेत झालेल्या खिचडी घोटाळाप्रकरणी ईडीमार्फत चौकशी सुरू आहे. या चौकशीत काहीही सापडणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.