BJP reaction Thackeray rally | ही सभा म्हणजे जिहादी मेळावा; निवडणुकीसाठी सोयीचं बंधन... भाजपच्या मंत्र्यांकडून ठाकरे बंधुंवर टीकास्त्र

BJP reaction Thackeray rally | उद्धव-राज ठाकरेंच्या पुनर्मिलनावर भाजपकडून तीव्र प्रतिक्रिया
nitesh rane - ashish shelar - chirag paswan
nitesh rane - ashish shelar - chirag paswanPudhari
Published on
Updated on

BJP reaction Thackeray rally

पुढारी ऑनलाईन डेस्क : शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या नुकत्याच झालेल्या एकत्रित सभेनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. या दोन चुलत बंधुंच्या राजकीय पुनर्मिलनावर राज्यातील सत्ताधारी भाजपकडून संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. कुणी याला “जिहादी मेळावा” ठरवलं, तर काहींनी हे दोघं एकत्र यावेत अशी सदिच्छा व्यक्त केली.

नितेश राणे : "ही सभा म्हणजे जिहादी मेळावा"

महाराष्ट्राचे मंत्री आणि भाजप आमदार नितेश राणे यांनी या सभेवर अत्यंत टीकात्मक भाष्य केलं. “आपण हिंदू आणि अभिमानी मराठी आहोत. जसे जिहादी समाज फोडण्याचा प्रयत्न करतात, तसंच हे लोक करत आहेत,” असं राणे यांनी म्हटलं. त्यांच्या या विधानावर सामाजिक माध्यमांवरही उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत.

nitesh rane - ashish shelar - chirag paswan
Uddhav Thackeray Vijay Melava: एकत्र आलोय, एकत्र राहण्‍यासाठी; उद्धव ठाकरेंकडून मनसेसोबत युतीचे संकेत

आशिष शेलार : "भाषेसाठी नव्हे, निवडणुकांसाठी सोयीचं बंधन"

मुंबई भाजप अध्यक्ष आणि सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनीही या एकत्रित सभेवर टीका केली. “महापालिका निवडणुका जवळ आल्यात आणि घाबरलेल्या ‘उबाठा सेना’ने अचानक ‘बंधुत्व’ आठवून शोभेची नाटकी सभा भरवली,” असा टोला त्यांनी ‘X’ (माजी ट्विटर) या सोशल मीडियावरून लगावला.

भाऊ एकत्र यावेत, ही चांगली गोष्ट - सुधीर मुनगंटीवार

दुसरीकडे, भाजप नेते व माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सौम्य भूमिका घेतली. “हे दोघं भाऊ एकत्र येणं आणि तसेच टिकून राहणं आवश्यक आहे. गरज पडली तर त्यांचे पक्षही एकत्र यायला हवेत. ते एकत्र येत असतील, तर ती सकारात्मक गोष्ट आहे,” असं ते म्हणाले.

nitesh rane - ashish shelar - chirag paswan
Raj-Uddhav Thackeray Vijay Melava : बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं, आम्हाला एकत्र आणलं; राज ठाकरेंची तोफ धडाडली

स्वार्थासाठीच पुनर्मिलन - केंद्रीय मंत्री चिराग पासवान

केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनीही या घडामोडींवर मत व्यक्त केलं. “ही एकत्र येण्याची भाषा, प्रांत वा धर्मासाठी नाही, तर केवळ स्वार्थासाठी आहे. हरवलेला जनाधार पुन्हा मिळवण्यासाठीची धडपड आहे,” असं पासवान म्हणाले.

राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात हिंदीभाषक राज्यांवर टीका करताना, “महाराष्ट्र पुढे आहे, पण ही राज्यं मागं आहेत,” असं म्हटलं होतं. यावर प्रतिक्रिया देताना पासवान म्हणाले, “भारतातील प्रत्येक माणसाला कुठेही राहण्याचा आणि कोणतीही भाषा बोलण्याचा अधिकार आहे. मी सर्व भाषांचा सन्मान करतो, पण ही विभागणीची राजकारणं मी मान्य करत नाही.”

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news