मुंबई; पुढारी वृत्तसेवा : विधानसभेच्या जागांसाठी कोणाच्या दारात जाणार नाही. विधानसभेत 200 ते 225 जागा लढविणार आहोत. यासाठी प्रत्येक मतदारसंघात निरीक्षक पाठविले जाणार आहेत. पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह समाजाच्या विविध घटकांशी हे निरीक्षक संवाद साधणार आहेत. त्यानंतरच पुढील निर्णय घेण्याची भूमिका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मांडली.
पक्षाच्या पदाधिकार्यांचा मेळावा गुरुवारी आयोजित केला होता. त्यावेळी राज ठाकरे यांनी भूमिका मांडली. तसेच फोडाफोडीच्या राजकारणाला महाराष्ट्रातील जनता वैतागली असून, जनता मनसेची वाट पाहात असल्याचा दावाही त्यांनी केला.