राज्यात तीन वर्षांत 37 हजार अपघात; 40 हजार मृत्यू

file photo
file photo
Published on
Updated on

बेशिस्त वाहतूक, असुरक्षित रस्ते आणि रस्त्यांवरील अतिक्रमणे यामुळे राज्यात अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यात प्राण गमावणार्‍या पादचार्‍यांची संख्या भयावह आहे. गेल्या तीन वर्षांत राज्यात 37 हजार 385 अपघातांमध्ये 40 हजार 321 नागरिकांनी जीव
गमावला आहे. यापैकी सर्वाधिक अपघात हे मुंबई आणि ठाण्यात झाले आहेत.

स्कायवॉक, भुयारी मार्गांचा अत्यल्प वापर

महामार्गावर बेफाम वाहनांमुळे अपघातांची संख्या वाढत आहे. रस्त्यांच्या बाजूला फेरीवाले, अस्ताव्यस्त उभी केलेली वाहने यामुळेही अपघात होतात. मोठ्या शहरांमध्ये नागरिकांना ये-जा करण्यासाठी महामार्गावर स्कायवॉक आणि भुयारी मार्ग बांधण्यात आले आहेत, मात्र त्यांचा वापर करण्याचे प्रमाण अत्यंत कमी आहे.

रस्ते अन् बळी…

राज्यातील राष्ट्रीय महामार्गांवर 14 हजार 58 अपघात 15 हजार 224 जणांनी जीव गमावला.
राज्य महामार्गावर 6 हजार 902 अपघात झाले असून त्यामध्ये तीन हजार 820 जणांनी जीव गमावला.
इतर रस्त्यांवर 17 हजार 64 अपघात झाले असून
6 हजार 481 जणांनी जीव गमावला.

अपघाताची कारणे…

  • वाहनांचा बेफाम वेग
  • रस्ते व पदपथांवरील अतिक्रमणे
  • बेशिस्त वाहनचालक व असुरक्षित रस्ते
  • पादचार्‍यांचा निष्काळजीपणा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news