मुंबई : राज्य सरकार शेतकर्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे. विदर्भासह राज्याच्या विविध भागात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून राज्य सरकारला अहवाल प्राप्त होताच तातडीने शेतकर्यांना मदत करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी दिली.
शिंदे म्हणाले, विविध भागात झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यासंदर्भात राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सविस्तर चर्चा झाली.