तुमच्या मित्राला धारावी गिळू देणार नाही : उद्धव ठाकरे | पुढारी

तुमच्या मित्राला धारावी गिळू देणार नाही : उद्धव ठाकरे

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : धारावी पुनर्विकासाच्या मुद्दयावर ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांच्यासह सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला.
आता हे धारावीसुद्धा गिळायला निघाले आहेत. त्यावर मी धारावीत येऊन स्वतंत्रपणे बोलणार आहे. मात्र, धारावीसुद्धा मित्राच्या घशात घातली जात असल्याचे सांगत मोदी-अदानी संबंधांवर भाष्य केले.

या प्रकल्पातून तब्बल दीडशे कोटींचा एफ एस आय मिळणार आहे. केवळ तुमच्या मित्राचे खिसे भरण्यासाठी हा प्रकल्प होणार असेल तर ते चालणार नाही. तिथे प्रत्येक धारावीकराला घर मिळायला हवे. सोबत तिथले उद्योगही टीकायला हवेत. अद्याप गिरणी कामगारांना घरे मिळाली नाहीत. उरलेल्या गिरणी कामगारांना धारावीत घरे द्या, वांद्रे वसाहतीचा पुनर्विकास करून तिथे घरे द्याच पण नंतरच्या कर्मचाऱ्यांना धारावीत घरे द्या, पोलिसांना धारावीत घरे द्या, अशी मागणीही ठाकरे यांनी केली. धारावी पुनर्विकासाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावत सवलती उधळल्या आहेत. त्यामुळे सगळे काही तुमच्या मित्राच्या खिशात घालु देणार नाही, त्यांना धारावी गिळू देणार नाही, असा इशाराही ठाकरे यांनी दिला.

Back to top button