मुंबई : चार साप्ताहिक विशेष गाड्यांचा कालावधी वाढला | पुढारी

मुंबई : चार साप्ताहिक विशेष गाड्यांचा कालावधी वाढला

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  पश्चिम रेल्वे मार्गावरील चार विशेष साप्ताहिक ट्रेनचा कालावधी तीन ते चार महिन्यांनी वाढवण्यात आला आहे. प्रवाशांची मागणी असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

०४७१२ वांद्रे टर्मिनस-बिकानेर विशेष साप्ताहिक गाडी २५ जून पर्यंत चालवली जाणार होती. आता ही गाडी १ ऑक्टोंबरपर्यंत चालेल. ०४७११ बिकानेर -वांद्रे टर्मिनस ही गाडी ३० सप्टेंबर पर्यंत धावेल. ०४७१४ वांद्रे-बिकानेर ही गाडी २९ सप्टेंबर तर, ०४७१३ बिकानेर – वांद्रे ही गाडी २८ सप्टेंबर पर्यंत धावेल. ०९६२२ वांद्रे टर्मिनस – अजमेर साप्ताहिक विशेष गाडी २५ सप्टेंबर पर्यंत, तर ०९६२१ अजमेर-वांद्रे ही गाडी २४ सप्टेंबर पर्यंत धावेल. ०९७२४ वांद्रे टर्मिनस- जयपूर ही गाडी २९ जून पर्यंत चालवली जाणार होती , ती आता २८ सप्टेंबर पर्यंत चालवली जाईल. ०९७२३ जयपूर- वांद्रे टर्मिनस ही गाडी २७ सप्टेंबर पर्यंत धावेल.

Back to top button