Maharashtra Politics : शिंदेंसारखाच प्रयोग राष्ट्रवादीबाबतही सुरू : संजय राऊत
मुंबई; पुढारी वृत्तसेवा : भाजपाने ईडीची भीती दाखवून शिवसेना फोडली. आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवरही ईडी कारवाईची भीती दाखवली जात आहे. शिवसेनेसोबत जो प्रयोग केला तोच राष्ट्रवादीबरोबर सुरू आहे, असा आरोप शिवसेना (ठाकरे गट) नेते, खा. संजय राऊत यांनी गुरुवारी केला. Maharashtra Politics
केंद्रीय तपास यंत्रणांची कारवाई आणि अटकेच्या भीतीने एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्याचा दावा आदित्य ठाकरे यांनी केला होता. यावर माध्यमांशी बोलताना राऊत यांनी आदित्य यांचा दावा खरा असल्याचे सांगितले. तसेच, एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासमवेत गेलेल्या लोकांवर जो प्रयोग केला गेला. तसाच प्रयोग राष्ट्रवादी काँग्रेससोबत सुरु असल्याचा दावाही केला. त्यामुळे केंद्रीय यंत्रणांचा वापर करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडण्याचे प्रयत्न सुरू असल्याचाच इशारा राऊत यांनी दिला आहे. Maharashtra Politics
दरम्यान, महाविकास आघाडीतून बाहेर पडू आणि भाजपासोबत जाऊ, नाही तर ईडी मला अटक करेल अशी भीती एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासमोर व्यक्त केली होती. तसेच, माझ्या भांडुपमधील घरी सुद्धा त्यांनी आघाडीतून बाहेर पडण्याची विनंती केली होती. पण, आम्ही त्यांना समजावत होतो. आपण प्रसंगाला सामोरे जाऊ, तुम्हालाच नव्हे तर माझ्याही अटकेची तयारी सुरु आहे पण मी त्यासाठी तयार असल्याचे त्यांना सांगितल्याचा दावा राऊतांनी केला. Maharashtra Politics
देशात दमनशाही सुरु आहे, जर आपण काहीही चुकीचे केले नाही तर अटकेला घाबरण्याची गरज नाही, आपण बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत. पक्षाने आपल्याला सर्व काही दिले आहे, त्यामुळे पक्षासोबत राहिले पाहिजे. तुम्हाला ते अटक का करतील, असे मी त्यांना विचारले. पण शरीर वाघाचे आणि काळीज उंदिराचे असा शिवसैनिक असू शकत नाही. पण ते घाबरून पळून गेले, असेही राऊत म्हणाले. Maharashtra Politics