ठाकरे यांच्या सभेसाठी मुंबई, ठाण्याचे लोक : मुख्यमंत्री शिंदे
मुंबई; पुढारी वृत्तसेवा : खरे शिवसैनिक, निष्ठावंत शिवसैनिक आमच्या सोबत आहेत. मागच्या निवडणुकीमध्ये कोकणातील जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवून दिली होती. त्यामुळे त्यांना माहीत होते, खेडमध्ये लोकांचा प्रतिसाद मिळणार नाही. लोक कसे गोळा होतील, याची त्यांना धास्ती होती. म्हणून त्यांनी मुंबई, ठाणे, पालघर येथून गाड्याच्या गाड्या भरून लोक सभेसाठी बोलवले होते,अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या सभेवर केली.