कसबा, चिंचवडची जागा मविआ एकत्र लढेल : संजय राऊत
पुढारी ऑनलाईन डेस्क : नागपूर आणि अमरावती दोन जागा आम्ही जिंकल्या. कारण आम्ही एकीने लढलो. आता कसबा, चिंचवडची जागा मविआ एकत्र लढेल, असे स्पष्टीकरण शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिले. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
उद्धव ठाकरेंनी विश्वासातील लोकांवर जास्त विश्वास ठेवला आणि त्याच लोकांनी ठाकरेंचा विश्वासघात केला. त्यांची संस्कृतीपेक्षा विकृती अधिक आहे.
राणेंच्या विधानाला काही आधार नाही. राणेंनी जे दावे केले आहेत, त्याचे उत्तर त्यांनी आता कोर्टात द्यावं. मी नारायण राणेंविरोदात कोर्टात बदनामीची केस दाखल केली आहे. आमचा न्यायवस्थेवर विश्वास आहे, असेही राऊत यांनी नमूद केले.