शिवाजी पार्क (मुंबई) येथून रविवारी (दि.२९) सकल हिंदू समाजाकडून हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. लव्ह जिहाद आणि धर्मांतरविरोधी कायदा लागू करण्याच्या मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. यात अनेक हिंदुत्ववादी संघटना सहभागी झाल्या होत्या. यावर बोलत संजय राऊत म्हणाले," पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदीत्यनाथ यांच्यासारखे हिंदुत्ववादी नेते आहेत. राज्य़ आणि देशात भाजपचे सरकार आहे. केंद्रात ८ वर्षांपासून हिंदुत्ववाद्यांचे सरकार असताना लव जिहाद, धर्मांतर सारख्या घटना घडत असतील तर तर या सत्तेचे अपयश आहे, अशी टीकाही त्यांनी केली.