मुंबई : रेल्वेसेवा विस्कळीत झाल्याने चाकरमान्यांना मनस्ताप
मुंबई : पुढारी वृत्तसेवा : दिवाळीच्या सुट्टीनंतर कामावर परतताना सकाळीच चाकरमान्यांना मनस्ताप सहन करावा लागला आहे. अंबरनाथहून कर्जतकडे जाणारी लोकलसेवा ठप्प झाली होती. मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी ट्विट करुन यासंदर्भात माहिती दिली आहे.
S-3 सीएसएमटी- कर्जत लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे रेल्वेसेवा विस्कळीत झाली होती. कर्मचाऱ्यांनी तत्काळ दुरुस्ती करत तांत्रिक बिघाड दूर केला आहे. त्यानंतर सकाळी ७ वाजून ५० मिनिटांनी रेल्वे वाहतूक पुन्हा सुरु झाल्याचे सांगितले.