‘५० खोके एकदम ओके’ ही घोषणा सत्ताधाऱ्यांना झोंबली : अजित पवार | पुढारी

'५० खोके एकदम ओके' ही घोषणा सत्ताधाऱ्यांना झोंबली : अजित पवार

पुढारी ऑनलाईन डेस्क : सत्ताधाऱ्यांना आमच्या घोषणा झोंबल्या आहेत. ‘५० खोके एकदम ओके’ ही घोषणा शिंदे गटाच्या आमदारांच्या जिव्हारी लागली. त्यामुळेच शिंदे गटाच्या आमदारांनी प्रत्युत्तर देण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे. अशी टीका विरोधी पक्षनेत अजित पवार यांनी सत्ताधाऱ्यांच्या आंदोलनावर केली आहे.

विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाचा दुसऱ्या आठवड्यातील आजचा दिवस वादळी ठरला. आज विधानभवनाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांविरोधात घोषणा दिल्या. सत्ताधाऱ्यांच्या आंदोलनावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली. विरोधकांनी वेगवेगळ्या गोष्टींवर आवाज उठवायचा असतो. अधिवेशन सुरू झाल्यापासून विरोधक म्हणून आम्ही पायऱ्यांवर घोषणा देत आहे. पण त्या घोषणा शिंदे गटाच्या आमदारांना झोंबल्या. आतापर्यंत विरोधी पक्ष घोषणा द्यायचा पण जाणीपूर्वक आमच्या घोषणांमुळे नाराज झालेले शिंदे गटाचे आमदार आज घोषणा देत आहेत. त्यांच्या वागण्यातून हे निष्पन्न झाले आहे की, दिलेल्या घोषणा त्यांच्या मनाला लागल्या आहेत. एकंदरीत चोराच्या मनात चांदणं, असा हा प्रकार आहे. पण राज्यातील जनतेने महाविकास आघाडीचे सरकार कोणत्या गोष्टीसाठी पाडले, याचा विचार करायला पाहीजे असे पवार यांनी म्हटले आहे.

हेही वाचा :

Back to top button