मुंबई : आरटीई प्रवेशाच्या 39 हजार 154 जागा रिकाम्या
मुंबई; पुढारी वृत्तसेवा : राज्यातील खासगी शाळेत आर्थिक दुर्बल व वंचित घटकातील बालकांसाठी राखीव असलेल्या आरटीई प्रवेशाच्या 39 हजार 154 जागा रिक्त राहिल्या आहेत. राज्यातील 9 हजार 86 शाळांमधील आरटीई प्रवेशासाठी 1 लाख 1 हजार 906 जागा उपलब्ध होत्या. या जागांसाठी राबविण्यात आलेल्या प्रवेशप्रक्रियेत 90 हजार 685 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. त्यापैकी 62 हजार 752 विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहे.
आरटीई प्रवेशासाठी राज्यभरातून 2 लाख 82 हजार 783 विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज केले होते. आतापर्यंत आरटीई प्रवेशात एक नियमित फेरी आणि प्रतीक्षा फेर्या पार पडल्या आहेत. चौथ्या फेरीतील विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी 30 जुलैपर्यंत मुदत देण्यात आली होती.
ही प्रवेशप्रक्रिया 3 ऑगस्टपर्यंत सुरू होती. राज्यात आरटीई प्रवेशाच्या नियमित फेरीत 62 हजार 752 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे. तर यापैकी 16 हजार 137 विद्यार्थी प्रतीक्षा यादीत होत. एकूण 78 हजार 889 विद्यार्थ्यांना
प्रवेश देण्यात आला आहे.
मुंबई आणि परिसरात झालेले प्रवेश
जिल्हा जागा अर्ज प्रवेश मिळाला प्रवेश घेतला
मुंबई 6451 15,050 5342 3238
ठाणे 12,267 25,419 10,429 6768
रायगड 4463 8778 3813 2696
पालघर 4863 2741 2216 1632