आपल्याच लोकांनी पाठीत खंजीर खुपसला : उद्धव ठाकरे | पुढारी

आपल्याच लोकांनी पाठीत खंजीर खुपसला : उद्धव ठाकरे

पुढारी ऑनलाईन डेस्क : जेव्हा काँग्रेस-राष्ट्रवादी सोबत जाण्याचा निर्णय घेतला त्यावेळी काहीजण सांगत होते की, ते दगा देतील. मात्र मी म्हणालो की, ठीक आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बाटलीवर असे लेबल लावले असेल तर शंकराप्रमाणे विष प्राशन करू. मात्र आज पहातो आहे की, सोनिया गांधी आणि शरद पवार आजही माझ्या पाठीशी उभे आहेत. सरकार असो वा नसो आम्ही तुमच्यासोबत आहोत असा शब्द काँग्रेस-राष्ट्रवादीने दिला आहे. आपल्याचं लोकांनी पाठीत खंजीर खुपसला, पण मी शिवसैनिकांच्या पाठीत खंजीर खुपसणार नाही असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिवसैनिकांशी संवाद साधताना म्हणाले.

शिवसेना ही मर्दांची आहे. सध्या शिवसेनेसोबत कोणीच राहिले नाही, असे सर्वत्र म्हटले जात आहे. मात्र तुम्ही सोबत आहात हे पाहून आनंद झाला. मी तुमच्या बळावर महाराष्ट्रभर सभा घेईन. शिवसेनेला गद्दारांच्या औलादी नकोत, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी बोलताना म्हणाले आहेत.

 

हेही वाचलंत का?

Back to top button