चंद्रकांत पाटील यांनी विजयानंतर ट्विट करत, सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले आहे आणि शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी पुढे असे म्हटले आहे की, राज्यसभा निवडणुकीत तिसरी जागाही जिंकणार, हे आम्ही ठामपणे सांगत होतो. आवश्यक नियोजन करून आम्ही विजय मिळवला, त्याचं श्रेय देवेंद्र फडणवीस यांच्या रणनीतीला आहे. पुढे असेही म्हणाले की, मविआची मतं फुटली नाहीत, भाजप अधिक विश्वासार्ह पर्याय वाटल्यानं ती आम्हाला मिळाली!