परभणी, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात मृग नक्षत्र सुरू झाल्यापासून पावसाने दोन वेळेस थोड्याफार प्रमाणात हजेरी लावल्यानंतर दीर्घ विश्रांती घेतली. यातच सोमवारी (दि.20) सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास शहरात
धो-धो पावसाने वादळी वार्यासह हजेरी लावली.
परभणी जिल्ह्यातील खरीप हंगामातील पेरणीचे काम पावसाने दीर्घविश्रांती घेतल्यामुळे खोळंबली होती. पावसाने उघडीप दिल्याने जमिनीत ओलावा निर्माण झाला नाही. यातच कृषी अधिकार्यांकडून चांगला ओलावा निर्माण झाल्यानंतरच सोयाबीन पिकाची पेरणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यातच सोमवारी (दि.20) सायंकाळी 6.30 वाजेच्या सुमारास वातावरणात अचानक बदल होऊन काळेकुट्ट ढग आकाशात जमा झाले आणि वादळी वार्यासह जोरदार पावसाने आपली हजेरी लावली. यामुळे थोड्याफार प्रमाणात का होईना शेतकर्यांना दिलासा मिळाला आहे. यंदा मान्सून लवकर दाखल होणार असा अंदाज वर्तवण्यात येत होता. मात्र, अर्धा जून उलटूनही पेरणीयोग्य पाऊस झाला नाही. त्यामुळे मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे.