Youth Drowns Parbhani | पाणी आणण्यासाठी गेलेल्या १९ वर्षीय तरुणाचा विहिरीत पडून मृत्यू

जिंतूर तालुक्यातील नवहती तांडा येथील घटनेने हळहळ
Jintur Well Drowning Incident
भारत प्रकाश राठोडPudhari
Published on
Updated on

Jintur Well Drowning Incident

चारठाणा : जिंतूर तालुक्यातील नवहती तांडा येथील १९ वर्षीय तरुणाचा शेतातील विहिरीत पडून बुडाल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (दि. ५) सकाळी घडली. या प्रकरणी चारठाणा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मयत तरुणाचे नाव भारत प्रकाश राठोड (वय १९, रा. नवहती तांडा, ता. जिंतूर) असे आहे. मंगळवारी सकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास भारत हा शेजारील काशीनाथ राठोड यांच्या नवहती शिवारातील शेतातील विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेला होता. पाणी काढत असताना त्याचा तोल जाऊन तो विहिरीत पडला. पाण्यात बुडाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

Jintur Well Drowning Incident
Parbhani news: पूर्णेतील रेल्वे उड्डाणपुलाजवळील रस्ता बनला दलदलीयुक्त

घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेबाबत विश्वनाथ मन्ना राठोड (वय ६०, रा. वाधी, ता. जिंतूर) यांनी चारठाणा पोलीस ठाण्यात माहिती दिली. त्यानुसार आकस्मिक मृत्यू नोंद नोंद करण्यात आली.

माहिती मिळताच चारठाणा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पिंपळे यांनी घटनास्थळी भेट देऊन आवश्यक कार्यवाही केली. पोलीस निरीक्षक बालाजी पुंड यांच्या मार्गदर्शनाखाली बीट पोलीस हवालदार कालवणे यांच्याकडे पुढील तपास सोपविण्यात आला आहे. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. या दुर्दैवी घटनेमुळे नवहती तांडा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news