![उष्माघाताने शेतकऱ्याचा मृत्यु](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2024%2F05%2FCopy-of-Untitled-Design-1-42.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पूर्णा, पुढारी वृत्तसेवा : उष्माघातामुळे एका भाजीपाला विक्री करणाऱ्या शेतकऱ्याचा शनिवारी (दि.११) मृत्यू झाला. पूर्णा तालूक्यातील उष्माघाताचा हा पहिला बळी ठरला. पूर्णा तालुक्यातील कात्नेश्वर येथे राहणारे भाजीपाला उत्पादक शेतकरी भानुदास मुंजाजी चापके (वय५४) असे मृताचे नाव आहे. चापके हे संदलापूर शिवारात गट क्रमांक १५ मध्ये दीड- दोन एकरातील काही क्षेत्रात ते भाजीपाल्याचे उत्पादन करत होते. (Parbhani News)
आठवड्यातील प्रत्येक शनिवारी कात्नेश्वर येथे बाजार भरत असल्यामुळे, ते शेतातील उत्पादित भाजीपाला विक्रीसाठी बाजारात आणून विकत होते. शनिवारी पूर्णा तालुक्यामध्ये तापमान ४१ अंशावर गेले होते. बाजारात भाजीपाला विक्री करत असतानाच दुपारी २ च्या सुमारास, त्यांची अचानक प्रकृती बिघडली. त्यानंतर ते बाजारातून थेट आपल्या घरी गेले. नातेवाईक त्यांना तातडीने गावातील रुग्णालयात घेवून गेले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेमुळे कात्नेश्वर गावात शोककळा पसरली आहे. (Parbhani News)
हेही वाचा :