बीड : गजानन चौकटे
उन्हाळा सुरू झाला की, दरवर्षी लिंबूचे भाव वाढतात. मात्र यंदा लिंबूचे भाव गगनाला भिडले आहेत. याचा परिणाम फक्त लिंबू सरबतावरच नाही तर अमवस्येला बांधल्या जाणाऱ्या लिंबू मिरचीवरही झाला आहे. अनेक दुकानांवर वाहनांवर आणि घराच्या गेटवर लिंबू मिरची लटकवतात. काहीजण याला अंधविश्वास मानतात तर काही जण रूढी परंपरेनुसार लिंबू मिरची बांधतात असं म्हटलं जातं. दोन महिन्यापूर्वी लिंबू मिरची हे दहा रुपयाला विकत मिळत होती परंतु आता लिंबूचे भाव गगनाला भिडल्यामुळे आता त्याची किंमत वीस रूपये झाले आहे.
बीड मधे लिंबू-मिरचीचे विक्रेते जास्त आहे यामुळे परगावातील लिंबू-मिरची विक्रेते हे बीड वरून अनेक ठिकाणी बाजारपेठेत विक्री साठी घेऊन येत असतात फार कमी लोक हा लिंबू मिरची तयार करतात, पण, हे फक्त बीड जिल्ह्यातच नव्हे तर इतर ठिकाणी देखील विकण्यात येतात. विक्रेते हे बीडमधून गेवराई व इतर ठिकाणी येथे एसटीने जाऊन तिथे पायी किंवा सायकलच्या मदतीने लिंबू मिरची यांची विक्री करतात. विविध वस्तूचे वाढलेले भाव म्हणून आम्हांला देखील साहित्य महाग भेटते म्हणून विक्रीसाठी येणाऱ्या बाहुलीची (लिंबू मिरचीसहीत) किमत देखील २० रुपयांवरून ४० रुपये झाली आहे. सध्या लिंबू ८० ते १०० झाले आहे. पण, लिंबू महाग झाल्याने त्याची किंमत आता वीस रुपये झाली आहे. तर घरावर बांधण्यात येणाऱ्यांची जास्त किंमत आहे.
दर शनिवार व अमावस्येला ठरलेल्या दुकानात व घरी आम्ही जातो. सध्या लिंबू महाग झाल्यामुळे लिंबू मिरची, बाहुलीची किंमत वाढली आहे. पण, कुणीही विरोध न करता आमच्याकडून खरेदी करतात व आमचा उदरनिर्वाह यावरच अवलंबून आहे.
– रामलाल पवार, लिबू-मिरची विक्रेते