समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, ७ ठार

दोन कारची धडक; जालना जिल्ह्यातील घटना
Samruddhi Highway accident
समृद्धी महामार्गावर अपघातातील कार क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढल्या. file photo

पुढारी ऑनलाईन डेस्क : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर शुक्रवारी भीषण अपघात झाला. दोन कारच्या धडकेत ७ जणांचा मृत्यू झाला, तर ४ जण जखमी झाले आहेत. जालना जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावरील कडवंची गावाजवळ रात्री अकराच्या सुमारास हा अपघात झाला.

नागपूरहून मुंबईकडे येणाऱ्या इर्टिका कारला चुकीच्या बाजूने येणाऱ्या स्विफ्ट डिझायर कारने धडक दिल्याने हा अपघात झाला. ही धडक इतकी जोरदार होती की कारमध्ये बसलेले प्रवासी रस्त्याच्या कडेला पडले. घटनेची माहिती मिळताच जालना पोलिसांनी घटनास्थळ गाठून क्रेनच्या सहाय्याने दोन्ही गाड्या बाहेर काढल्या. जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news